गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेला पर्याय ‘बलून थेरपी’

गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेला पर्याय ‘बलून थेरपी’
सततच्या वैद्यकीय संशोधनाद्वारे संततीनियमनासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आले आहे. यापूर्वी वापरल्या जाणार्‍या तंत्रामंध्ये तात्पुरत्या संतती नियमानासाठी निरोध, संततीनियमनाच्या गोळ्या, कॉपर-टी  आशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत, पण कायमस्वरुपी उपाय म्हणून मात्र गर्भाशय काढून टाकणे हाच पर्याय इतके दिवस वापरला जात होता, पण आता गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेला उत्तम, सुरक्षित व कमी खर्चाचा पर्याय म्हणजे ‘बलून थेरपी’. या नव्या तंत्रज्ञानाबद्दल स्पायर इंडिया रेमेडीज्‌च्या वतीने प्रबोधन केले जात आहे.
प्रत्येक वेळी गर्भाशयाची पिशवी काढण्याची खरच गरज असते का?
मासिक पाळी हा स्त्रीच्या जीवनातील अविभाज्य घटक! वयाच्या १३/१४ व्या वर्षी सुरू झालेली ही क्रिया गरोदरपणाचा काळ सोडल्यास रजोनिवृत्तीपर्यंत दर महिन्याला अव्याहतपणे चालूच असते. इस्ट्र्रोजन व प्रोजेस्टेरॉन या अंत:स्त्रावाच्या असमतोलतेमुळे कधी-कधी गर्भाशयाच्या आतील स्तराची प्रमाणाबाहेर वाढ होऊन हा स्तर जेव्हा पाळीच्या वेळी बाहेर फेकला जातो तेव्हा अनियमितता अतिरक्तस्त्राव व पोटात जास्त दुखणे (वूीाशपेीीहरसळशी) अशा प्रकारचा त्रास संभवतो. हा काळ स्त्रीला शारीरिक व मानसिकदृष्ट्या खूपच क्लेषदायक ठरतो. साधारणत: वयाच्या ३० वर्षांनंतर ही तक्रार आपले उग्र स्वरूप दाखवायला सुरुवात करते.
प्रचलित तपासणी व उपचार पद्धती :-
१) सोनोग्राफी व रक्ताच्या तपासण्या २) महिन्याला हार्मोन्सच्या गोळ्या घेणे ३) क्युरेटिंग करणे ४) गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे ५) टीसीआरई ६) मायक्रोवेव्ह ऍब्लेशन.           हार्मोन्सच्या गोळ्या सतत घेतल्यानेही शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. उदा. पित्त वाढणे, वजन वाढणे, स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाणही या महिलांमध्ये येते. गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे ही एक मोठी शस्त्रक्रिया असते. शारीरिक, आर्थिक व मानसिक दृष्ट्या पेशंट यामध्ये अधू होतो. शिवाय सर्वसामान्य शस्त्रक्रियेत असणारे व त्यासाठी लागणार्‍या भुलेतील धोकेही वेगळेच! पिशवीबरोबर अंडाशयही काढून टाकल्यास पेशंटला मोनोपॉजल सिंड्रोम अधिक तीव्रतेने जाणवतो. यात अंगातून गरम वाफा येणे, घाम येणे, चिडचिडेपणा, कातडीचा रुक्षपणा, योनीमार्गाचा कोरडेपणा, हाडे ठिसूळ होणे, हृदयावर परिणाम होणे, मूत्राशयाचे वारंवार इन्फेक्शन होणे इ. प्रकार जाणवतात. आतापर्यंत गर्भपिशवीच्या ऑपरेशनला कोणताही पर्याय नव्हता, परंतु या शस्त्रक्रियेस अत्यंत प्रभावी व निर्धोक असे पर्याय आता उपलब्ध झालेले आहेत.
१) बलून थेरपी २) टीसीआरई ३) मायक्रोवेव्ह ऍब्लेशन
बलून थेरपी काय आहे ?
मासिक पाळीच्या अति रक्तस्त्रावाचे एक प्रमुख कारण असते, आतील अस्तराची अनियमित व अनिर्बंध वाढ. अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या साह्याने सोयीस्कर तरीही अत्यंत प्रभावी अशी बलून थेरपी अस्तित्वात आली. या थेरपीमध्ये छोट्याशा भूलीखाली एक विशिष्ट नळी गर्भाशाच्या तोंडातून आत टाकणेत येते. तिच्या तोंडाशी एक खास फुगा बसविलेला असतो. अत्याधुनिक मायक्रो प्रोसेसर असलेल्या मशिनच्या साह्याने हा फुगा पाण्याच्या साह्याने फुगविल्यावर तो पिशवीचा आकार घेतो. त्यानंतर त्यातील तापमान व दाब नियंत्रित केला जातो. या नियंत्रित उष्णतेमुळे गर्भाशयाचे आतील स्तर व आवरण नष्ट होते. शिवाय नियंत्रित दाबामुळे प्रत्यक्ष गर्भाशयाच्या पिशवीबाहेरील अवयवांना इजा होत नाही.
बलून थेरपीचे फायदे
१) गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्यासाठी मोठे ऑपरेशन करावे लागत नाही. २) शरीरावर कोणतीही जखम किंवा व्रण नसतो. ३) भूल व शस्त्रक्रिया छोटी असल्याने तिच्या अनुषंगाने येणारे धोकेदेखील कमी असतात. ४) महिना दीड महिना विश्रांतीची गरज असत नाही. दोन-तीन दिवसांमध्ये कामाला सुरुवात करता येते. ५) रक्तदाब, डायबेटिस, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणापूर्वी पोटावर शस्त्रक्रिया असणार्‍या स्त्रियांना अत्यंत फायदेशीर व कमी धोकादायक. ६) ८५ ते ९० टक्के महिलांची पाळी बंद होते. उरलेल्यांमध्ये पाळी चालू राहिली तरी रक्तस्त्रावाचे प्रमाण अल्प असते. ७) गर्भ अंडकोष शरीरात राहिल्याने मेनोपॉजचे सर्व त्रास कमी होतात. ८) ऑपरेशनच्या वेळी जरुरी असणार्‍या बाहेरील रक्ताची गरज भासत नाही. ९) उपचारानंतर तीन-चार दिवसांनी शारीरिक संबंध ठेवता येतात. १०) प्रत्येक रुग्णासाठी वेगळा बलून वापरला जातो. ११) रुग्ण त्याचदिवशी घरी जातो.
बलून थेरपीचा खर्च
नवीन अत्याधुनिक उपचारपद्धती म्हटली की, ती महाग व सर्वसामान्यांना परवडणार नाही अशी वाटते, परंतु बलून थेरपी याला अपवाद आहे. उपचार, औषध, हॉस्पिटल, भूलतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ यांचा सर्व खर्च गर्भपिशवी काढून टाकणार्‍या ऑपरेशनच्या मानाने कमी आहे. गर्भपिशवी काढून टाकण्याच्या ऑपरेशनच्या मानाने कमी आहे. गर्भपिशवी काढून टाकण्याच्या ऑपरेशनपूर्वी बलून थेरपीचा आपण जरूर विचार करावा.
बलून थेरपी कोणासाठी ?
१) ज्या महिलांना पाळीत अतिरक्तस्त्राव होतो. २) ज्यांच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये मोठ्या गाठी (षळलीेळवी) नाहीत. ३) उच्चरक्तदाब, हृदयविकार, मधुमेह इ. आजार आहेत.
बलून थेरपीबद्दल रुग्णांच्या व नागरिकांच्या प्रबोधनासाठी स्पायर इंडिया रेमेडीज्‌च्या वतीने  विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन केले आहे. बलून थेरपीच्या अधिक माहितीसाठी  यातील तज्ज्ञ डॉ. सतीश दोशी यांचे ‘बलून थेरपी’ या विषयावर व्याख्यान व कार्यशाळा आयोजित केल्या जातात. अधिक माहितीसाठी डॉ. सतीश दोशी यांच्याशी (०२१८५)-२२२६९४ येथे संपर्क साधावा.
- अमर पुराणिक
Edit

Posted by - Admin,
on - Tuesday, January 31, 2012,
Filed under - ,
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

Post a Comment

Post a Comment